गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार मुख्य कल्याणकारी योजनांद्वारे दिल्लीच्या रहिवाशांना लाभ देण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे, परंतु राज्य सरकारचा अडथळावादी दृष्टीकोन (‘आप-दा’) प्रगती रोखत आहे हे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले.
आयुष्मान भारत आणि सौरऊर्जा अनुदानासारख्या महत्त्वाच्या सेवांपासून दिल्लीकर कसे मुकत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दिल्लीत भाजपची सत्ता आल्यावर समाजातील सर्व घटकांना लाभ मिळण्यासाठी या योजना त्वरीत लागू केल्या जातील, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले.

 
                             
                             
                             
                            









