गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ॲड.अरविंद सुधाकरराव आव्हाड यांना कायदा क्षेत्रातील सर्वोच्च पदवी !
पुणे : ज्येष्ठ विधिज्ञ डाॅ.ॲड. सुधाकरराव आव्हाड यांचे पुत्र ॲड.अरविंद सुधाकरराव आव्हाड यांनी कायदा क्षेत्रातील सर्वोच्च पदवी, डाॅक्टरेट संपादन केली आहे. त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पी.एच.डी मिळाली आहे.
हिंदू महिलांचे वारसाहक्क हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. (“Legal analysis of right of Hindu women in property by inheritance in perspective of gender equality, interface between customery and statutory law”) हिंदू वारसा कायद्याचे कलम ६ नुसार महिलांचे हक्क, पारंपरिक कायदे व कायद्यातील बदल यावर अतिशय अप्रतिम असे विवेचन असणारे स्वतंत्र प्रकरण या प्रबंधात आहे.
याकामी त्यांना अमरावती विद्यापीठातील लाॅ डिपार्टमेंट प्रमुख डाॅ. विजयकुमार चौबे मार्गदर्शक होते.
ॲड.अरविंद यांनी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात एका प्रख्यात सिनियर वकीलांकडे ज्युनिअरशिप सुरू करून सर्वोच्च न्यायालयातच वकीलीला सुरुवात केली. अल्पावधीतच ते सर्वोच्च न्यायालयाची ॲडव्होकेटस ऑन रेकाॅर्ड ही परीक्षा उत्तम गुण मिळवत उत्तीर्ण झाले आणि आता सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकीली व्यवसाय करीत आहेत.
मा. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या केसमध्येही त्यांनी राज्य सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली होती. पुणे मनपा, तसेच महाराष्ट्र सरकार, पर्यावरण महामंडळ यांच्या केसेसमध्ये त्यांनी अनेकदा यश मिळवले आहे.
ॲड अरविंद यांना संपूर्ण महाराष्ट्रातील बार असोसिएशनमार्फत व्याख्यानासाठी बोलावले जाते, इंग्रजी,मराठी, हिंदी या भाषांवर असलेल्या प्रभुत्व मुळे त्यांचे वक्तृत्व हे अमोघ आहे, जटिल कायद्याचा विषय सुलभ करुन सांगण्याची त्याची हातोटी जबरदस्त आहे. याव्यतिरिक्त त्यांनी कायदेविषयक विपूल लेखन केलेले आहे, लीगल हिस्ट्री या नावाजलेल्या पुस्तकाचे ते लेखक आहेत.
जाहिरात